Tuesday, March 5, 2019

ट्रॅजिडी श्रीधर तिळवे नाईक

कार्यकर्ते राजकारण लिहीतायत फेसबुकवर
त्यांना नेत्यांवरची निष्ठा प्रकट करायची आहे
आणि ह्या देशात फक्त खोटं बोलूनच
नेत्यावरची निष्ठा दाखवता येते

कुणाला तिकीट हवं आहे
कुणाला संघटनेत पद हवं आहे
तर कुणाला सामूहिक संरक्षण


कार्यकर्ते घाबरलेले आहेत कि
निष्ठा कशी मोजली जाणार आहे
आणि कोण मोजणार आहे

कार्यकर्त्यांना कळत नाहीये
आपल्यासारख्या सामान्य माणसाकडे
नेत्याची नजर कशी वळवून घ्यायची

कार्यकर्ते येनकेनप्रकारेण
स्वतःकडे लक्ष्य वेधून घेतायत

कोणी फ्लेक्स लावतायत
कोणी ट्रॉल करतायत

त्यांना बुद्धिमान लोकांशी विचारवंतांशी
काहीही देणंघेणं नाही

त्यांना माहित आहे
निवडणूक तिकिटप्राप्तीसाठी पदप्राप्तीसाठी काम करून घेण्यासाठी
इन्टिलेक्च्युअल्स निकम्मे आहेत

त्यांना राजकारण नीट कळलंय
आणि सत्तेची खार तरी आपल्याकडे वळावी म्हणून
ते कुणालाही राम करायला तयार आहेत
कुणासाठीही हनुमान बनायला तयार आहेत

रामांना माहित आहे कि हे कलियुगाचे रामायण आहे

ते रामाचा अभिनय करतायत

सत्ता हीच एक अभिनय होऊन गेलीये

कुणालाच सत्तेने काय साधायला जन्म घेतलाय
ह्याच्याशी देणंघेणं नाही

सर्वत्र अभिनय ऍक्टिव्हेट आहे
फेसबुक ट्वीटर व्हाट्स अप

चेहरा कुणाकडेच शिल्लक नाही

श्रीधर तिळवे नाईक
(निर्वाण सिरींजमधील आत्ताच्या कविता ह्या फाईलमधून )